कन्हान ता.प्र.दी.७: – खेडी (खोपडी) गावा वरून आजणी रामटेक कडे जाणा-या रस्त्या वरील खडकी नाल्यावरील पुल काल झालेल्या पाऊसाने नाला भरून वाहुन येथील पुल पाऊस पुराच्या पाण्याने वाहु न तुटल्याने परिसरातील शेतक-याना शेतीवर, आजनी व रामटेक ला जाण्या चा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेडी (खोपडी) वरून आजनी कडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील खडकी नाला पुलाचे बांधकाम अंदाजे २५ वर्षा पुर्वी झाले होते. नंतर ४ वर्षा अगोदर पुलावर ची स्लॅब उखडल्याने दुरूस्ती करण्यात आली होती. गुरूवार (दि.६ ) ला झालेल्या जोरदार पावसाने खंडाळा केरडी कडुन येणारा खेडी (खोपडी) गावाजवळील खडकी नाल्याला जोरदार पुर आल्याने खेडी ते आजनी, रामटेक कडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील पुला वरून पुराचे पाणी वाहुन पुल तुटुन स्लॅब पुर्ण वाहुन गेल्याने येणे जाणे बंद झाले आहे. गावक-यांचा हा रस्ता वर्दळीचा असुन एकमेव पुल असल्याने गावक-या चे शेतात व आजनी, रामटेक ये-जा बंद होऊन संपर्क तुटल्याने या पुलाची व्यव स्था त्वरित करून देण्याची मागणी सुशील ठाकरे, अमोल नागपुरे, आकाश कोचे, आशिष कोचे, निकेश घरजाळे, दुर्गेश मेश्राम, लक्ष्मीकांत घरजाळे, राहुल वानखेडे, श्रीकांत चौधरी, मंगेश कडु, सुनील ठाकरे, संतोष काळे, सुनिल काळे ,विजय ठाकरे, खुशाल शेंडे, दशरथ कडु हेमराज वैद्य, रोशन ठाकरे, दुर्गेश सावर कर, कृष्णा काळे सह ग्रामस्थ शेतक-यां नी केली आहे.